N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

'फालतू बात'... नितीश कुमारांनी या मुख्यमंत्र्यांना झापले!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
पाटणा : दरम्यान मुख्यमंत्री आणि त्यांचा सहकारी पक्ष भाजपमध्ये मतभेद असल्याचं आता स्पष्टपणे समोर येऊ लागलंय. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपचे स्टार प्रचारक यांच्या जाहीर सभांतील वक्तव्यांमुळे तर या गोष्टीवर शिक्कामोर्तबच झालंय. काही दिवसांपूर्वी भाजचे स्टार प्रचारक आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कटिहारच्या एका जाहीर सभेत बांग्लादेशी घुसखोरांना देशातून 'बाहेर फेकण्याचं' वक्तव्य केलं होतं. यावरच निशाणा साधत जनता दल युनायटेड (JDU) चे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी योगींच्या वक्तव्याला '' म्हटलंय. 'कुणातही इतका दम नाही की ते आपल्या लोकांना देशाच्या बाहेर काढू शकतील', असंही नितीश कुमार यांनी म्हटलंय. बिहार विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आता बाकी आहे. याच दरम्यान एका जाहीर जनसभेला संबोधित करताना नितीश कुमार यांनी हे वक्तव्य केलंय. या भाग मुस्लीमबहुल भाग म्हणून ओळखला जातो. या भागात बोलताना मुख्यमंत्र्यांनी अल्पसंख्यांक कल्याणासाठी आपल्या कार्यकाळातील कार्यांचा उल्लेखही केला. वाचा : वाचा : आपल्या या भाषणातील एक छोटा व्हिडिओ त्यांनी ट्विटरवरून शेअर केलाय. 'सर्वांना सोबत घेऊन जाणं हाच आमचा धर्म आहे. हीच आमची संस्कृती आहे. सगळे एकत्र येणार तेव्हाच बिहार पुढे वाटचाल करेल' असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. आपल्या भाषणात 'नागरिकत्व संशोधन कायद्या'विरोधात निशाणा साधला. 'हा दुष्प्रचार कोण करत राहतं, फालतू बात करत राहतो. कोण कुणाला देशाच्या बाहेर करणार आहे? सगळे हिंदुस्तानाचे आहेत, सगळे भारताचे आहेत, कोण कुणाला बाहेर करणार साहेब? या देशात कुणातही इतका दम नाही. हे काय बडबड करत राहतात. जेव्हापासून तुम्ही संधी दिलीत तेव्हापासून आम्ही समाजात प्रेम, बंधूभाव आणि सद्भावनेचं वातावरण तयार केलंय. सर्वांना एकत्र आणण्याचाच आमचा प्रयत्न राहिलाय. समाजात भांडणं सुरू राहावीत, यासाठी काही जणांकडून जाणून-बुजून प्रयत्न केले जात आहेत, त्यामुळे काही कामं करण्याचीच गरज पडणार नाही असं त्यांना वाटतंय. मात्र, आम्ही तर काम करतच राहतो आणि सर्व लोक एकत्र राहावेत, समाजानं पुढे वाटचाल करावी, प्रगती करावी हाच आमचा उद्देश आहे' असं नितीश कुमार यांनी आपल्या या भाषणा दरम्यान म्हटलंय. बिहार निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ७८ जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीत एआयएमआयएम पक्षानंही सीएए आणि एआरसीचा मुद्दा उचलून धरलाय. वाचा : वाचा :

https://ift.tt/3fcy07h
November 05, 2020 at 12:40PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा