यंदा गणेशोउत्सव नाही! 'लालबागचा राजा' मंडळाचा ऐतिहासिक निर्णय
N4U
११:०५ AM
महाराष्ट्र ठळक बातम्या
,
महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
,
Latest Maharashtra News in Marathi
,
Maharashtra News
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:

मुंबई: संकटाच्या पार्श्वभूमीवर '' सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा गणपती उत्सव साजरा न करण्याचा अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. सामाजिक भान जपत यंदा आरोग्यउत्सव साजरा करण्याचं मंडळानं ठरवलं आहे. (Lalbaugcha Raja Mandal Cancelled Ganesh Festival) वाचा: करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व धर्मीयांनी आपापले सण साधेपणाने व शक्यतो घरात राहूनच साजरे करावेत, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच केलं आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच राज्यातील गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींसोबत बैठकाही घेतल्या होत्या. या बैठकींमध्ये उत्सव नेमका कसा साजरा करायचा, मूर्तीची उंची किती असावी, सोशल डिस्टन्सिंगचे पालन कसे करावे, या संदर्भात चर्चा झाली होती व मंडळांना याबाबतचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार अनेक मंडळांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करून उत्सवात बदल करण्याचे निर्णय घेतले होते. मुंबईतील गणेश गल्ली येथील 'मुंबईचा राजा' मंडळानंही यंदा उत्सवमूर्तीची प्रतिष्ठापना न करता केवळ पूजेची मूर्ती ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 'चिंचपोकळीचा चिंतामणी' मंडळानं आगमन मिरवणूक सोहळा व पाटपूजन सोहळा रद्द केला आहे. मुंबईसह राज्यातील अन्य अनेक मोठ्या मंडळांनीही असेच निर्णय घेतले आहेत. 'लालबागच्या राजा' मंडळानं त्याही पुढं जाऊन उत्सवच साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी राजाच्या मंडपात रक्तदान व प्लाझ्मा दानाची शिबिरं घेतली जातील, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. त्यामुळं 'लालबागचा राजा' यंदा भक्तांना अगदी वेगळ्या रूपात दर्शन देणार हे स्पष्ट झालं आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे ८७ वे वर्ष आहे. वाचा: असा होणार लालबागच्या राजाचा उत्सव गणेशमूर्ती न बदलण्याबाबत निर्णयावर शिक्कामोर्तब! ११ दिवस फक्त रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपीसारखे उपक्रम राबवणार.. करोनालढ्यात शहिद झालेल्या पोलिस पोलिसांच्या कुटुंबातील २० वीरमातांचा सन्मान गलवान खोर्यात शहिद झालेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपत्नींचा सन्मान मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपये देणार देशभर कीर्ती ‘लालबागच्या राजा’चा उत्सव हा मुंबई आणि महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात लोकप्रिय आहे. गणेशोत्सव काळात देशभरातून अनेक भाविक राजाच्या दर्शनासाठी मुंबईत येतात. या निमित्तानं लालबागला जत्रेचं स्वरूप आलेलं असतं. बॉलिवूडमधील सेलिब्रिटी, राजकीय मंडळी, क्रीडापटूही लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आवर्जून येत असतात. त्यामुळं यंदा गणेशोत्सव साजरा करण्याचा मंडळाचा निर्णय अनेकार्थांनी महत्त्वाचा मानला जात आहे. वाचा:
https://ift.tt/3fau8np
July 01, 2020 at 10:22AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा