धारावीतील करोना नियंत्रणात; ठाकरे सरकारचं केंद्राकडून कौतुक

मुंबईः आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत गेल्या दोन महिन्यांपासून करोनाने थैमान घातलं होतं. मात्र, गेल्या आठवड्याभरापासून धारावीतील करोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आलं आहे. केंद्र सरकारनंही धारावीतील रुग्ण संख्या कमी झाल्याबद्दल आणि राज्य सरकारच्या कामाचं कौतुक केलं आहे. महापालिकेने योग्य पाऊलं उचलल्याने मे महिन्यात ४.३ टक्के असणारी रुग्णवाढ जून महिन्यात १.२ टक्क्यांवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयानेही मुंबई महापालिकेचं कौतुक केलं आहे. वाचाः धारावीतील करोना रुग्ण दुपटीचा वेगही आता ७८ दिवसांवर आला आहे. तसंच परवा धारावीत ७ रुग्ण आढळले होते. तर रविवारी १२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. पालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला यश येत आहे. दाटीवाटीचे भाग व झोपडपट्ट्यांमुळे करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्याच भागात आता रुग्ण घटत आहेत. तसंच, गेल्या काही दिवसांत धारावीत एकाही रुग्णांचा करोनामुळं मृत्यू झाला नाहीये. ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल. वाचाः दरम्यान, धारावीमध्ये करोना संसर्गावर नियंत्रण आणण्यात यश आल्यामुळे शहराच्या जिवात जीव आला आहे. तरीही धारावीकरांचा पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. मुख्य शहराला लघुउद्योगांच्या माध्यमातून उत्पादने पुरवणारे धारावीतील उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. बाहेरून येणाऱ्या मोठ्या उत्पादकांनीही धारावीमध्ये माल देणेही बंद केले आहे. येथून ज्या महिला आसपासच्या भागांमध्ये घरकामगार म्हणून जात होत्या, त्यांच्याकडेही सोसायट्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे धारावीतला संसर्ग नियंत्रणात आला असला तरीही जगायचे कसे, हा प्रश्न मात्र अद्याप सुटलेला नाही.
June 22, 2020 at 04:42PM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा