मिठाईवरून लग्नसोहळ्यात हाणामारी; नवरदेवानं केली नवरीच्या भावाची हत्या
N4U
१:५१ PM
India News
,
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:

फर्रूखाबाद: उत्तर प्रदेशातील फर्रुखाबादमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका लग्नाच्या सोहळ्यात मिठाई वाढण्यावरून तुफान हाणामारी झाली. वाद इतका टोकाला गेला की, दारुच्या नशेत असलेल्या नवरदेवानं नवरीच्या ९ वर्षांच्या भावाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याचं अपहरण केलं. घटनेनंतर पळून जाण्याच्या नादात त्यानं ३ महिलांनाही चिरडले. तर अपहरण केलेल्या भावाची हत्या करून त्याचा मृतदेह गावाबाहेर फेकून दिला. फर्रुखाबादच्या शमशाबादमध्ये ही खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. अतसैनी पहाडपूर गावातील रहिवासी मनोज कुमार सोमवारी वरात घेऊन गोविंदपूर अहदुल्लापूर गावात आला. नवरदेव वरातीसह रात्री साडेआठच्या सुमारास येथे पोहोचला. वऱ्हाडी आल्यानंतर त्यांना नाश्ता आणि पाणी देण्यात आलं. नवरदेव मनोज आणि त्याच्या मित्रांनी नाश्ता आणि व्यवस्थेवरून जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. घरातील सदस्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावर ते आणखीनच चिडले, अशी माहिती नवरीचा दुसरा भाऊ पुनीत (वय १९) यानं दिली. गावठी पिस्तुलातून मामावर गोळीबार नवरदेवाच्या मित्रांनी वाद घातल्यानंतर नवरीच्या मामावर गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. मामानं त्यापासून आपला बचाव केला. त्या लोकांनी प्रचंड गोंधळ घातला होता. गावकऱ्यांनी मनोज आणि त्याच्या मित्रांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पसार झाले, असं पुनीतनं सांगितलं. नवरीच्या भावावर पिस्तुल रोखला... नवरा मुलगा आणि त्याच्या मित्रांनी नवरीचा लहान भाऊ प्रांशू याच्यावर पिस्तुल रोखलं. त्यानंतर त्याला घेऊन कारमधून पळ काढला. पळून जाताना त्यांनी इतर तीन महिलांना कारखाली चिरडले. यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. नवरीच्या कुटुंबीयांनी मनोजला अनेकदा फोन केला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही. दुसरीकडे या घटनेची गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. गावाबाहेर फेकला मृतदेह नवरा मुलगा आणि त्याच्या मित्रांनी दुसऱ्या दिवशी पहाटे नवरीच्या भावाची हत्या करून त्याचा मृतदेह गावाबाहेर फेकला आणि तेथून पळून गेले. प्रांशूची गळा आवळून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितलं. तसंच ५० वर्षीय विमला, मिथलेश (३५) आणि सपना (१७) जखमी झाल्या आहेत. या तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिथलेशची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. तर सपना आणि विमला यांना गंभीर जखमा झाल्या आहेत. वधूचे वडील रामपाल जाटव यांनी नवरदेव आणि त्याच्या मित्रांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून, त्यांचा शोध सुरू केला आहे. ठिकठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं.
https://ift.tt/3fcy07h
June 16, 2020 at 09:05PM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा