'मुख्यमंत्र्यांवर टिप्पणी करण्याची रिया चक्रवर्तीची लायकी नाही', बिहार डीजीपींचं वक्तव्य
N4U
१:१६ PM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
नवी दिल्ली / पाटणा : दिवंगत अभिनेता ( Case) प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयानं सीबाआयकडे सोपवण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालायचा हा निर्णय पोलिसांचा विजय म्हणून पाहिला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आल्यानंतर बिहारचे गुप्तेश्वर पांडेय (Bihar ) यांनी या निर्णयाचा आपल्याला खूपच आनंद झाला असल्याचं म्हटलंय. 'हा अन्यायाविरुद्ध विजय' असल्याची तसंच '१३० कोटी लोकांच्या भावनांचा विजय' पुष्टीही त्यांनी मीडियाशी बोलताना जोडली. 'न्यायालयाच्या या निर्णयामुळे सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान आणखीनच वाढेल. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात निश्चित रुपात न्याय मिळेल, अशी आशा लोकांमध्ये निर्माण झालीय' असं त्यांनी मीडियाशी बोलताना म्हटलं. या प्रकरणातील आरोपी हिच्याबद्दल बोलताना, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दल बोलण्याची रियाची 'लायकी' नसल्याची टिप्पणीही त्यांनी यावेळी केलीय. 'आमच्यावर आरोप लावण्यात येत होते की तुम्ही ही केस का घेतली? आम्हाला चौकशी करण्यापासून रोखण्यात येत होते. आम्ही आपला आयपीएस अधिकारी पाठवला तर त्याला एखाद्या कैद्याप्रमाणे रात्री १२.०० वाजता क्वारंटीन करण्यात आलं. तेव्हाच काही ना काहीतरी गडबड असल्याचं ध्यानात आलं होतं. आम्ही जी काही कारवाई केली ती कायदेशीररित्या योग्य पद्धतीनं केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं यावरच शिक्कामोर्तब केलंय. मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी धैर्यानं प्रतिक्षा करावी' असंही यावेळी यांनी म्हटलंय. संबंधित बातम्या : वाचा : वाचा : वाचा : महाराष्ट्र पोलिसांवर ताशेरे ओढथाना त्यांनी 'महाराष्ट्र पोलिसांचा व्यवहार पूर्णत: बेकायदेशीर होता. या प्रकरणात नक्कीच निकाल येईल कारण हा गुप्तेश्वर पांडेय किंवा एका कुटुंबाची लढाई नाही तर संपूर्ण १३० कोटी लोकांची लढाई आहे' असंही गुप्तेश्वर पांडेय यांनी जोशात येत म्हटलं. सोबतच 'बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर कमेंट करण्याची रिया चक्रवर्तीची लायकी नाही' या वाक्याचा पुनरुच्चार करतानाच त्यांनी 'बिहारचे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच सुशांत न्याय मिळण्याची आशा दिसू लागलीय... सुशांत मृत्यू प्रकरण सीबीआयपर्यंत पोहचलं' असंही त्यांनी म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे न देता तो सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सुनावला आहे. सोबतच, सुशांत संदर्भात आणखी कुठलंही प्रकरण दाखल झालं तर त्याची चौकशी सीबीआयचं करेल, असंही कोर्टानं स्पष्ट केलंय. इतर बातम्या : वाचा : वाचा : वाचा :
https://ift.tt/3fcy07h
August 19, 2020 at 12:43PM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा