'काँग्रेसला बांधून ठेवण्याची क्षमता केवळ गांधी कुटुंबाकडे'
N4U
११:०५ AM
महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
,
Latest Maharashtra News in Marathi
,
Maharashtra News
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
मुंबई: 'काँग्रेस पक्षाला एकजीव ठेवण्याची, बांधून ठेवण्याची क्षमता केवळ गांधी कुटुंबाकडे आहे. इतिहासातही हे अनेकदा सिद्ध झाले आहे. या वास्तवाची जाणिव ठेवूनच पक्षाची पुढील वाटचाल झाली पाहिजे,' असं सांगतानाच, 'सक्षम, संयमी व संवेदनशील नेते असलेल्या यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे,' अशी आग्रही मागणी नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी केली आहे. ( as congress president) दिल्लीत आज काँग्रेस कार्यसमितीची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत पक्षाचा पुढील अध्यक्ष कोण यावर चर्चा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याराज्यातील नेते आपापली मते व्यक्त करत आहेत. हायकमांडचे विश्वासू नेते अशी ओळख असलेले अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्या नावाला अध्यक्षपदासाठी पसंती दिली आहे. वाचा: 'भारताची एकता, अखंडता तसेच प्रगतीमध्ये नेहरू-गांधी कुटुंबाने दिलेले योगदान अपूर्व आहे. देश व काँग्रेस पक्ष संघटित ठेवण्यासाठी पुढील काळातही त्यांच्या सक्रिय नेतृत्वाची नितांत गरज आहे. पक्षाला एकजीव ठेवण्याची, बांधून ठेवण्याची क्षमता केवळ गांधी कुटुंबाकडे आहे आणि इतिहासातही हे अनेकदा सिद्ध झाले आहे. या वास्तवाची जाणिव ठेवूनच पक्षाची पुढील वाटचाल झाली पाहिजे,' असं मत त्यांनी एका निवेदनाद्वारे व्यक्त केलं आहे. 'पक्षाच्या अध्यक्ष पदासंदर्भात काँग्रेस कार्यसमिती निर्णय घेईल. परंतु, राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्ष पद स्वीकारावे, अशी कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा आहे. राहुल गांधी हे सक्षम, संयमी व संवेदनशील नेते आहेत. सर्वसामान्यांच्या व्यथांना त्यांनी नेहमीच अत्यंत दूरदर्शीपणे व नेमकी वाचा फोडली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर व्यापक देशहिताची भूमिका परखडपणे मांडली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व त्यांनी करावे,' अशी आमची मागणी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ' यांनी अडचणीच्या काळात काँग्रेस पक्षाला उभारी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली युपीए-१ आणि युपीए-२ च्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात सर्वसामान्यांना न्याय देणारे, देशाला विकासाची नवी दिशा देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय झाले. कोणतीही महत्वाकांक्षा न बाळगता केवळ कर्तव्यभावनेतून त्यांनी देश व काँग्रेसची सेवा केली. त्यामुळे पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत त्या योग्य व सर्वमान्य निर्णय घेतील,' असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
https://ift.tt/3fau8np
August 24, 2020 at 10:06AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा